HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्ण वाढल्यास पश्चिम बंगालसारखा महाराष्ट्रालाही निर्णय घ्यावा लागेल! – विजय वडेट्टीवार

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये जसा मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र कोरोनाची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रात देखील पश्चिम बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. तशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली, असे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही९ मराठीशी संवाद साधताना दिली आहे. 

वडेट्टीवार म्हणाले,  “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने राज्यात प्रवेश केला आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याची कोरोना रुग्णांची संख्या काल (२ जानेवारी) ११ हजाराच्या घरात पोहोचली होती. अशा परिस्थिती आता शाळेतील विद्यार्थ्यी हे कोरोना टार्गेट असणार आहे. यामुळे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करणे, यासाठी महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज केली आहे. यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर लसीकरणाची मोहिम राबविली आहे. विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालक-पालकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तसेच एका लसीकरण केंद्रावर किती लस लागणार आणि त्याची चाचणी झाली आहे. त्याचबरोबर लसीकरमाचा साठा कमी पडणार नाही, हे नियोजन केले असून लसींचा साठा कमी पडणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 

मुंबईतील लोकलसंदर्भात सरकार लवकर निर्णय घेईल

“मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे पाहाता मुंबईसंदर्भातील लोकलबाबत लवकरात लवकर कठोर निर्णय असल्याचे संकेत त्यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबईतील काही ठिकाणी बीएमसीने कंटेन्मेंट झोन तयार केले असून त्या ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे. कंटेन्मेंट झोन परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल,” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याला मोठा दिलासा ! कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांहून कमी, तर कोरोनमुक्त ६० हजारांच्या पार 

News Desk

‘देशातलं आरोग्यखातं अपयशी,गडकरींकडे सुत्र सोपवा’ शिवसेनेचा गडकरींना पाठिंबा !

News Desk

…म्हणून देशातला लॉकडाऊन अयशस्वी, राहुल गांधींचा दावा 

News Desk