HW News Marathi
Covid-19

काँग्रेसनं १०० वर्षे सत्तेत न येण्याचं ठरविलं!; पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर घाणाघात

नवी दिल्ली | संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. संसदेत आज (७ फेब्रुवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांचे भाषण पूर्ण झाली आहेत. “कोरोना संकटातही काँग्रेसचे काम पवित्र करता आले नाही. उलट काँग्रेसने कोरोना काळात पाप वाढविले. काँग्रेसने १०० वर्ष सत्तेत न येण्याचे ठरविले आहे,” असा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र यांनी संसदेतील भाषणातून केला आहे. मोदींच्या संसदेतील वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षेप घेतला आहे. 

“कोरोना काळात भारताने एकजुटीने काम केले. पण, या काळात काँग्रेस राजकारण करत होती, असेही ते संसदेत म्हणाले. कोरोनाच्या काळात मुंबईतील मंजुरांना यूपी आणि बिहाराल जाण्यासाठी काँग्रेसने तिकीटे पुरविली होती. त्यामुळे यूपी आणि बिहारमध्ये कोरोनाची संख्या वाढली. यामुळे कोरोना पसरविण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे,”  असा हल्लाबोल मोदींने काँग्रेसवर केला. 

“सरकारी योजनांची रक्कम ही आता येट लाभार्थींच्या खात्यात जमा होते. तर जनतेमध्ये तुम्ही राहिला असता तर या सर्व गोष्टी तुम्हाला काळाल्या असत्या. परंतु, तुम्ही आजही २०१४मध्ये अडकलेले दिसत आहात. तसेच देशातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे. यापूर्वी देशातील जनतेने तुम्हाला ५० वर्षे देश चालवण्याची संधी दिली होती, पण हे कदाचित तुम्ही विसराल असाल,” असेही मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या काळात १० टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा दर वाढला होता. परंतु, २०१४ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला होता.  यावर्षी कोरोना असून देखील महागाईचा दर ५.२ टक्के राहिले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आकडा वाढला ! राज्यात आज तब्बल १३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच केंद्र सरकारची इच्छा आहे का?”

News Desk

सोमय्या म्हणतात -“करुन दाखवलं”, पुढचा नंबर कुणाचा?

News Desk