HW News Marathi
Covid-19

राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! – राजेश टोपे

मुंबई | राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यादृष्टीने प्रशासनानेही खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशा चर्चा सुरू आहेत. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (८ जानेवारी) पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली असून मुख्यमंत्री सतत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांशी चर्चा करतात, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निर्बंधांबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले, सध्या रुग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळेच त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. यावरून लस घेणे जास्त गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. तसेच लस घेतलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे. लस घेतलेल्यांना कोरोना झालाच तरी लसीमुळे त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यात टाळाटाळ करु नये, असे त्यांनी संगितले. राज्यात १० जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायला सुरुवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याशिवाय राज्यात सध्या कोव्हिशील्ड लसीच्या ६० लाख, तर कोव्हॅक्सिन लसीच्या ४० लाख डोसचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना याविहायी माहिती दिली आहे. तर केंद्र सरकार देखील महाराष्ट्राला लसींचा साठा कमी पडू देणार नाही, अशी आशाही राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

यावेळी टोपे यांना राज्यात निर्बंध लावण्यात सरकार का उशीर करत आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, सध्या लोकांची गर्दी टाळणे या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. लोकांचे व्यवसाय सुरू रहावेत, हातावर पोट असणाऱ्यांनाही रोजगार चालू असावा, यासाठीही विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा विचाराधीन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक पॅकेजचे आत्तपर्यंतचे गणित !

News Desk

“ओळखा पाहू कोण?” अमृता फडणवीसांची नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

News Desk

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk