HW News Marathi
Covid-19

मुंबईच्या लोकल बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही! – राजेश टोपे

मुंबई | “मुंबईच्या लोकल बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही”, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. राजेश टोपे यांनी आज (६ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. राज्यात कोणत्याही प्रकारच्या सभारंभांना परवानगी नाही, असे ते म्हणाले. 

टोपे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्याच्या कोरोना परिस्थितीवर दररोज चर्चा करतात. हे दोघे दररोज सकाळी फोनद्वारे चर्चा करत असतात. राज्यातल्या निर्बंधांबाबत दोघे बोलून निर्णय घेतली असेही टोपेंनी सांगितले. निर्बंधासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काल (५ जानेवारी) बैठक घेतली होती. त्यातही काही चर्चा झाली आजही चर्चा झाली. यासंदर्भातील योग्य ते निर्णय शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या चर्चेतून घेतली. 

“मुंबईच्या लोकल बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही. त्याचबरोबर तर्तास तरी जिल्ह्यातंर्गत वाहतूक बंद केली जाणार नाही. तसेच राज्यातील अत्यावश्यक नसलेल्या गोष्टींसाठी निर्बंध लावण्याच्या आणि सध्या असलेल्या निर्बंधांच्या कडक अंमबलजाबवणीच्या सूचना,” देणार असल्याचे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक आणि रिलायन्सचा हा करार टेक क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवूक

News Desk

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

डेल्टा व्हेरिएंट लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची शक्यता, WHO ने दिली माहिती

News Desk