HW News Marathi
Covid-19

राज्यात आता सात दिवसांचा ‘होम क्वारंटाईन’

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात होम क्वारंटाईनचा कालावधी फक्त सात दिवस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात  लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे टोपे म्हणाले. याआधी होम क्वारंटाईन दहा दिवसांचा कालावधी कमी करून सात दिवसांवर आणण्यात आला आहे. तसेच सात दिवसांनंतर पुन्हा रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. 

मुंबईत काल १५ हजार १६६ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णालयात आधीच रुग्ण दाखल असतील आणि बेडची कमतरता असेल तर त्या रुग्णांची परिस्थिती पाहून ३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात यावे, असे बीएमसीने सांगितले आहे. रुग्णालयाने ८० टक्के कोरोना बेड आणि १०० आयसीयू वॉर्ड रुम उघडण्यात यावे. बीएमसीच्या परवानगीशिवाय कोणत्याही रुग्णाला बेड देण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  बीएमसीच्या नव्या नियमानुसार, इमारतीच्या कुठल्याही विंग, कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीमध्ये एकूण फ्लॅट २० टक्के फ्लॅटमध्ये कोरोना रुग्णा आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ विधानानंतर राहुल गांधी अन् मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा

News Desk

पुण्यात आजपासून काय सुरु का बंद? जाणून घ्या…

News Desk

गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त !

News Desk