HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : जवानांच्या शौर्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले सलाम

नवी दिल्ली । कारगिल विजय दिवसाची आज २० वी वर्षपूर्ती झाली आहे. या निमित्ताने आज (२६ जुलै) देशभर कारगिल विजय दिवस साजरी केला जातो. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती २५ ते २७ जुलै अशी तीन दिवस साजरी होणार आहे. भारतीय सैन्याच्या धैर्य आणि शौर्याला सलाम करत आहे.

कारगिल विजय दिनानिमित्ताने द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहली. याशिवाय राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून म्हटले की, “कारगिल विजय दिवस २० वी वर्षपूर्तीवर भारतीय सैन्याच्या धैर्य आणि शौर्याला सलाम करत आहे. कठिण परिस्थितीत देशाच्या सन्मानाची रक्षा करणाऱ्या सर्व शहीत जवानांना देशातील जनता श्रद्धांजली अर्पण करत आहे.” असे म्हणाले आहेत

या कार्यक्रमाचा समारोप २७ जुलैला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. २० वर्षापूर्वी कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ८ मे ते २६ जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते, तर १३६३ जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता बाप्पा पण झाला सिंघम?

swarit

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

News Desk

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk