HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | तिरंग्याच्या रोषणाईने मुंबईची शोभा वाढली

यंदा भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आहे. मुंबईसह संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनादिवशी मुंबईत अनेक प्रसिद्ध इमारतींना भारताच्या तिरंग्यातील रंगांची रोषणाई केली जाते. या तिरंग्याच्या रोषणाईत या इमारती अत्यंत सुंदर आणि उठून दिसतात. अनेक जण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केवळ ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करतात.

प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही संबोधले जाते. भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० सालापासून भारतीय संविधान अंमलात आणण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारीला राज्यघटना अंमलात आणण्यात आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्करातील मेजर आणि जवान जखमी

News Desk

नवे मंत्री आज आपल्या पदाचा कारभार हाती घेणार; पंतप्रधानांनी बोलावली बैठक

Jui Jadhav

जेएनयूच्या जीवघेण्या हल्लाचा देशभरातील विद्यार्थ्यांसह दिग्गज नेत्यांनी नोंदविला निषेध

News Desk