HW News Marathi
मनोरंजन

Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित – पंतप्रधान

मुंबई | आज विजय दिवस आहे. विजय दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विजय युद्धात शहिद झालेल्या शूर शहीदांचे स्मरण करुन अभिवादन केले. १९७१ मध्ये या दिवशी भारत-पाक युद्धात ९० ते ९५ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते.

रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की आज देशातील लोक सुरक्षित असण्यामागे देशात शहिद झालेल्या लोकांचे पराक्रम आहेत. पंतप्रधान मोदींनी आज केलेल्या ट्विटमध्ये विजय दिवसामध्ये १९७१ च्या युद्धात अतुलनीय धैर्याने लढणा-या आपल्या बहादुर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अटल पराक्रम आणि देशप्रेम यांमुळे देश सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून जवानांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विजय दिवसाच्या औचित्य साधून रामनाथ कोविंद यांनी सैनिकांचे अभिनंदन केले आहे. रविवारी इंडिया गेट येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदम पुन्हा चर्चेत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड ट्विटरद्वारे ट्विट

News Desk

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; स्नेही राजेश दामलेंची माहिती

Aprna

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

News Desk