HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि राज ठकारेंचे सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणामुळे मानले जाहीर आभार

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर सर्व नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. या प्रकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या तिघांनी निषेध केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या (१५ मे) नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेतून त्यांनी या तिन्ही नेत्यांचे जाहीर आभार मानले. या कृतीतून मराठी संस्कृती दिसते, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी केतकीला ओळखत नाही. त्यांचे मत आहे, त्यांच्या आणि यंत्रणेसोबत झालेला संवाद आहे. मी त्यावर काही बोलू इच्छित नाही. कोणाच्याही वडिलांवर कुठल्याही व्यक्तीवर त्यांनी मरावे, असे कोणी बोलतो. कोणत्या संस्कृतीत बसते. हा संस्कृतीचा भाग आहे. मला असे वाटते, या निमित्ताने मी माननीय उद्धव ठाकरे, माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय राज ठकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. अशी ही जी कृती आहे, यातून मराठी संस्कृती दिसते. यात आम्ही सगळ्यांनी मिळून सातत्य ठेवले पाहिजे. त्यासाठी कधीही कोणावर तर मी स्वत: त्यांच्याविरोधात उभी राहीन. कारण का ही जी विकृती सुरू झालेली आहे. ही समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होईल. ती आमच्यावर नाही, तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर येवू शकते. अशी जी प्रवृत्ती आहे. ती कुठल्याही समाजात, जगामध्ये फार चांगली किंवा कुठल्याही समाजात.”

कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही

“माध्यम ही काही न्याय मागायची जागा नाही. न्याया मागण्याची पोलीस आणि न्यायालय आहे. माध्यामांचा गैरवापर अशा गोष्टीसाठी करणे हे हास्यपद आहे,” असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. जी कोणी अशा वक्तव्य आणि पोस्ट करताना सर्वांनी भान ठेवणे गरजेचे असते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाले, “मी स्वत: भान ठेवून वागते. माझ्यावर ते संस्कार आहेत. माझ्यावर मध्यमवर्गीय मराठी संस्कार आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. जर मला काही वेगळे वाटत असेल. तुम्हाल तर काही वेगळे वाटत असेल तर गुड लक टू. तुम्हाला वाटत असेल ती पोस्ट चांगली असेल तर तर ती तुमची वैयक्तिक निवड असेल. मी ज्या मराठी संस्कृतीत वाढले. कोणी तरी मरावे, असे माझ्या संस्कृतीत कोणाबद्दलही अपशब्द काढणे. माझ्या मराठी संस्कृतीत बसत नाही. मी कधीच कोणाबद्दल माझ्या वडिलांनी त्यांच्या ५५ वर्षात त्यांच्यावर इतके हल्ले झाले. कधी त्यांनी कोणाविरोधात एक शब्द काढला नाही. ही आमची मराठी संस्कृती आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

Gauri Tilekar

“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”भाजपकडून मागणी

Jui Jadhav