HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाच्या मृत्यूचं रहस्य उघड; मानखुर्द पोलिसांकडून २ आरोपींना अटक

मुंबई । मानखुर्दमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बालाजी राजू नायडू व्यक्तीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी २ आरोपींना अटक केले आहे. १३ मे रोजी रात्री ९ वाजून ३० मिनिटाला ३ व्यक्तींमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादातून बालाजी राजू नायडू व २ अनोळखी व्यक्तींमध्ये धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत २२ वर्षीय बालाजी खाली पडला व त्याच्या डोक्यात पाठीमागील बाजूस दुखापत झाली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात १४ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. भादवी कलम ३०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी मानखुर्दच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला नेमण्यात आले.

या गुन्ह्यातील आरोपी निरनिराळया ठिकाणी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज द्वारे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदिनाथ गावडे व गुन्हे प्रकटीकरण पथकातिल पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय माल्वेकर आणि पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर निम्जकर यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. २२ वर्षीय मोहम्मद सलमान मोहम्मद इद्रिस शेख आणि २९ वर्षीय गणेश कुमार रेडी असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आले होते.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींना १५ मे रोजी कुर्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. कुर्ला कोर्टाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, २० मे ला त्यांच्या कोठडीचा काळ संपणार असून पुन्हा कुर्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झोपेत असताना सरकार जाईल हे वक्तव्य पाटलांनी जागेपणीचं केलं ना?, अजित पवारांचा पलटवार

News Desk

संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही भाजपचा इशारा!

News Desk

आत्तापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो पण आता गडबड वाटतेय!

News Desk