HW News Marathi
महाराष्ट्र

… शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं; गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

मुंबई। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या, एवढेच नव्हे तर कोणाला कोणते मंत्रिपद द्यायचे हेही ठरले होते, असे वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केल्यामुळे एकच खळबळ माजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे, अशी ऑफर दिल्याचे त्यांनी लोकसत्ता’ या वृत्त पत्राच्या ‘अष्टावधानी’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमा वेळी सांगितले. पवारांच्या गौप्यस्फोटनंतर राज्याचे राजकारण ढवळून गेले.

पवारांच्या वक्तव्यवर गिरीश महाजन यांनी विचारल्यावर ते म्हणाले, “शरद पवार हे आता अर्धसत्य सांगत असून, शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, हे खरे असून याबाबत दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एवढेच नाही तर या बैठकीत कोणाला कोणते मंत्रिपद द्यायचे हेही ठरले होते, पण जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी त्यांनी दिलेला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजनांनी पवारांवर केला आहे.

शरद पवार नेमके काय म्हणाले

शरद पवार म्हणाले, “भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. पंरतु, याबाबत मोदींनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण, तरीही तुम्ही विचार करा, असे मोदी यांनी सांगितले. राज्यात आमचेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे, हा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल, “

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

News Desk

शेतीच्या पाण्याचे दर वाढवल्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न –अजित पवार

swarit