HW News Marathi
महाराष्ट्र

‘खाल्ल्या मिठाला जागावे’, सुप्रिया सुळेंचा सुजय विखे-पाटलांना टोला

मुंबई | भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या दोघांमध्ये संसदेत संघर्ष पाहायला मिळाला आहे. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या प्रश्नावर बोलताना यूपीए सरकारवर सुजय विखे-पाटील यांनी टीका केली. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यूपीए सरकारच्या काळात हे स्वत: काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावे, माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे.”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “यूपीए  सरकारच्या काळात सुजय विखे पाटील यांचे वडील मंत्री होते. तेव्हा ते गांधी परिवारांशी जवळचे संबंध होते. युपीए सरकारने जी धोरणे तयार केली. तेव्हा ते त्यांचा भाग होते. यामुळे खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे, असे मला माझी संस्कृती सांगते, असे त्या संसदेत बोलत होत्या. 

सुजय विखे पाटील नेमके काय म्हणाले

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावर चर्चा करताना विरोधकांनी स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि शेतकरी सशक्तीकरण हे सर्व सुरूच सहकार चळवळीतून झाले असून माझा जन्म अशा कुटुंबात झाला की,  जिथे माझे पणजोबा कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. यूपीएला हा स्टार्टअप इंडिआ दिसू शकला नाही. कारण यूपीए एक आणि दोनमध्ये सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कर्ज घेण्यासाठी भाग पाडले गेले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

News Desk

सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना अर्थ नाही – पंकजा मुंडे

News Desk

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk