HW News Marathi
राजकारण

अनंत गितेंना फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…

पणजी | शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. खासकरून महावाकिसात आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गितेंच्या वक्तव्यामुळे गोची झाली आहे. याचीच संधी साधत भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गितेंचं वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

ते फार काळ टिकणार नाही

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेलं हे महाविकास आघाडीचं सरकार अनैसर्गिक आहे. ते फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी अनंत गितेंच्या वक्तव्यावर दिली. अनंत गितेंच्या वक्तव्यावर मी काय बोलणार? पण शिवसेनाला वास्तवाची जाणीव झाली आहे आणि तेच गिते बोलत आहेत, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस हे गोव्याच्या दौऱ्यात आहेत.

तीन पक्षांची आघाडी झाली ती अनैसर्गिक

अनंत गितेंच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात ज्या प्रकारे विरुद्ध विचारसरणी असलेल्या तीन पक्षांची आघाडी झाली ती अनैसर्गिक असल्याचं मी सुरवातीपासून सांगत आलोय. अशा प्रकारचे आघाडी फार काळ टीकत नाही. कारण त्यात सामान्य काहीच नाही. ही अनैसर्गिक आघाडी टीकणार नाही, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसारच झाल्या पाहिजे, याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाककडे आणि दहशतवाद्यांना वठणीवरच आणा! 

swarit

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

News Desk

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला

News Desk