HW News Marathi
महाराष्ट्र

टरबुजाचे भाव घसरल्याने शेतकऱ्याचाही घसरला पारा ; टरबुज उखडून फेकले

नांदेड | टरबूजाचे भाव घसरल्यानंतर शेतकऱ्याने टरबुजाचे पिक उखडुन फेकल्याची घटना नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात घडली आहे. पूर्वी टरबूज १५ ते २० रुपये प्रति किलोने विकत होते. मात्र आता दहा रुपयांना दोन नग विकत आहेत. भावात झालेली घसरण पाहून शेतकरी आपल्या शेतातील टरबुजाचे पिक उखडून फेकत आहे.

फेब्रुवारी महिन्यातील लागवड केली असून चार पैसे मिळतील या आशेने व मोठ्या कष्टाने पिकलेले टरबुज पिकाचा कवडीमोल भावामुळे शेतात लाल चिखल होत आहे. अर्धापूर तालुक्यातील पांगरी शिवारात गट नं. १०६ मध्ये विठ्ठल बालाजी सोनवणे यांनी तिन एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली असून भाव मिळत नसल्याने लाखों रुपये किंमतीचे पिक उखडुन फेकले आहे.

टरबुज पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने विक्री दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अर्धापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून कवडीमोल भावाने विक्री होत असल्याने लाखो रुपयांचे पिक फेकून द्यावे लागत आहे. १५ ते १७ रुपये किलो दराने विक्री होणारे टरबुज पिक मात्र ३ ते ४ रुपयांना विकले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.भावातील घसरण पाहून उत्पादक चिंतेत पडले आहेत. टरबुज बाजारात विक्रीस नेण्यासही परवडत नसल्याने व वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना सर्व माल फेकुन धावा लागत आहे.

तीन एकर मध्ये दीड लाख रुपये खर्च करून विविध औषधांची फवारणी केली व दिवस-रात्र पाणी दिले पण अचानक दर कोसळल्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने रब्बी हंगामातील खर्च कसा करायचा अशी प्रतिक्रिया आमच्याशी बोलतांना सोनवणे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश!

News Desk

संभाजी राजेंचे नाव बिडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! 

News Desk

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk