HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पाच महाविद्यालये झाली ‘स्वायत्त’ 

मुंबई । यूजीसीन जानेवारी २०१९ मध्ये राज्यातील आठ महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा दिल्याचे घोषित केले होते. यानंतर आता राज्यातील अजून पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालय संख्येच्या आखढ्यात वाढ होऊन ७३ वर येवून पोहचला आहे. नवीन स्वायत्ततेचा दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये तीन महाविद्यालये ही मुंबईतील असून उरलेली दोन नागपूर आणि अमळनेर येथील आहेत. मुंबईतील या तीन महाविद्यालयांमुळे मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयांच्या आखढ्यात वाढ होऊन २३ ऐवढी संख्या झाली आहे.
पाच वर्षांपूर्वी राज्यात स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या फक्त ३६ होती. आता या संख्येत वाढ होऊन ७३ वर आली आहे. सप्टेंबर महिन्यात स्वायत्ततेसाठी झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून स्वायत्तता मिळाल्यास महाविद्यालयच्या व्यवस्थापनेला काम करण्याची मोकळीक मिळणार आहे. हे लक्षात घेऊनच महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे.
स्वायत्त संस्था, महाविद्यालयांना नवे विषय सुरू करण्याचे, इतरत्र शाखा उघडण्याचे, प्राध्यापकांना प्रोत्साहनपर सुविधा देण्याचे, शैक्षणिक करार करण्याचे, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय महाविद्यालयांचा अभ्यासक्रम उद्योगक्षेत्राला लिंक करता येणार आहे.

या ‘पाच’ महाविद्यालयांना स्वायत्तचा दर्जा मिळाला

  • पोदार महाविद्यालय – मुंबई
  • प्रताप महाविद्यालय – अमळनेर
  • निर्मला निकेतन सोशल वर्क महाविद्यालय – मुंबई
  • एम. एम. शाह महाविद्यालय – मुंबई
  • तिरपुडे महाविद्यालय – नागपूर

स्वायत्ततेचा दर्जा म्हणजे नेमके काय?

स्वायत्त मिळालेल्या महाविद्यालयांना त्यांचा अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात येते. त्याचबरोबर या महाविद्यालयांना नवीन परीक्षापद्धती आणि त्याची नवीन कार्यपद्धती राबविण्याचेही स्वातंत्र्य मिळते. या महाविद्यालयांना कार्यक्षेत्राबाहेर नवीन संशोधन, अभ्यास केंद्र, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश, तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती असे अनेक बदल करता येतात.

Related posts

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

News Desk

“बाळासाहेब गेले मात्र ठाकरे भाषा तिथेच संपली”, नारायण राणेंचं वक्तव्य!

News Desk

आजचा सुजाण बालक उद्याचा आदर्श नागरिक | अशोक बनकर

News Desk