HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा नाही; PMLA न्यायालायने फेटाळला जामीन अर्ज

मुंबई | मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता देशमुखांचा तुरुंगास वाढला आहे. देशमुखांना ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी १०० कोटींच्या वसुली  आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर देशमुखांना आर्थर रोड न्यायालयीन कोठडीत ठेवले आहेत. या प्रकरणावर आज (१४ मार्च) देशमुख सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला. 

मुंबईमधील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशा आदेश देशमुखांनी दिला होता. या वसुलीची जबाबदारी देशमुखांनी सचिन वाझेंवर सोपवली होती, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

नेमके काय आहे प्रकरण

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. यानंतर देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आणि ईडीने चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक केली.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही

News Desk

बेळगाव सीमाप्रश्नावर कर्नाटक-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी !

News Desk

हाथरस घटना म्हणजे फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या – अण्णा हजारे

News Desk