HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल,” बाळा नांदगावकरांचा इशारा

मुंबई | राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, अशा इशारा मनसे नेते बाळा नांदगावर यांनी धमकीच्या पत्रासंदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले. बाळा नांदगावर यांनी आज (११ मे) सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचे पत्र आल्याची माहिती देऊन दिली. नांदगावरांच्या लालाबाग कार्यालयात पोस्टाद्वारे धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात अजानच्या विषयावरून धमकी दिल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  कोणी लिहिले हे मला माहिती नाही. “गृहमंत्र्यांनी मला सांगितले की, मुंबई पोलीस आयुक्तांशी ताबडतोब बोलतो. त्याप्रामाणे ते मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले असून त्यावर काय कारवाई करायाची ते करतील.”

बाळा नांदगावकर म्हणाले, “काल मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना भेटलो. आणि क्राइम ज्वाइंट कमिश्नर यांची भेट घेतली. लालगाबमधील माझ्या कार्यालयात तीन चार दिवसापूर्वी मला एक धमकीचे पत्र आलेले आहे. भोंग्याचा विषय झाल्यापासून अशा प्रकारचे धमक्या आल्या आहेत, अशा प्रकारचे एक पत्र होते. या पत्रात मला जिवे मारण्याची धमकी दिली आहेच. पण, राज ठाकरे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे मी काल (१० मे) राज ठाकरेंना पत्र दाखविले. यानंतर काल सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्त आणि क्राइम ज्वाइंट कमिश्नर यांची भेट घेतली. या पत्राची खरी पत्र त्यांना दिली असून यापुढे पोलीस काय कारवाई करतील हे पाहू.”

राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला. तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही

हे पत्र कुठू आले होते आणि या पत्रावर कोणती तारीख होती, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर नांदगावर म्हणाले, “अजानच्या विषयावरून कोणी लिहिले हे मला माहिती नाही. पत्र कोणाकडून आले यांची मला कल्पना नाही. पण, हे पत्र पोस्टमधून माझ्या कार्यालयात आले आहे,” असे ते म्हणाले गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले का?, या प्रश्नावर नांदगावकर म्हणाले, “गृहमंत्र्यांनी मला सांगितले की, मुंबई पोलीस आयुक्तांशी ताबडतोब बोलतो. त्याप्रामाणे ते मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलले. आणि त्यावर काय कारवाई करायाची ते करतील. मी ऐवढेच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावर ठिक आहे. परंतु, राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला. तर मात्र महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. यांची दखल महाराष्ट्र सरकारने तर घ्यावीच, मी वारंवार राज ठाकरेंसाठी सुरक्षा मागतोय. राज ठाकरेंच्या कुटुंबासाठी राज सरकार आणि केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी. भोंग्याचा विषय हा सामाजिक आहे, तो विषय धार्मिक नाही. भोंगाचा त्रास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकांना त्रास आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ,मुश्रीफांचा टोला …

News Desk

आज राज्यात ३५० नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्णसंख्या २६८४ वर पोहोचली

News Desk

भाजपला धक्का, जळगावात ११ नगरसेवक शिवसेनेत!

News Desk