HW News Marathi
महाराष्ट्र

BMC निवडणुकीत ‘या’ शिवसैनिकांना मिळणार उमेदवारी

मुंबई | मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. तर दुसऱ्याबाजुला मुंबई महापालिका निवडणुका देखील जवळ आल्याचा आहेत. यामुळे आता पालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. या पालिका निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्याची हे ठरले आहे. त्यामुळे शिवसेनेत ४५ ते ५० च्या वयोगटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही. शिवसेनेचे या निर्णयामुळे  या पालिका निवडणुकीत तरुण पिढीला उमेदवारी देण्याचा चर्चा शिवसेनेत सुरू असल्याची माहिती हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टल या दिलेल्या रिपोर्टमधून मिळाली आहे. परंतु, यासंदर्भात शिवसेनेकडून अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ निवडणुकाची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. निवडणूक कधी होणार आणि राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार की कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हे मार्गदर्शकाच्या भूमिके असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरच महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीकडून तरी कोणतीही माहिती मिळाली नसून हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टल यांनी रिपोर्टमध्ये दिली आहे. 

सध्याच्या घडीला शिवसेनेत युवा आणि ज्येष्ठ अशी कार्यकर्त्यांची फळी आहे. कोरोनामुळे ५० वर्षावरील पदाधिकाऱ्यांना बाहेर फिरता येणार नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत युवकांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. तर ४५ ते ५० वर्षाच्या कार्यकर्त्यांनी तिकटसाठी हट्ट करू नये, अशा चर्चा केला आहे. भाजपचे सर्व नगरसेवक हे ४५ ते ५०च्या आतील असून त्यामुळे जेव्हा ते दुसऱ्यांदा निवडून येतील तेव्हा त्यांचा अनुभव अधिक असेल. तसेच आदित्य ठाकरे हे शिवसेनेमध्ये नवीन फळी तयार करत आहे, असा आदित्य ठाकरेंचा फॉर्म्युला असल्याची हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टलने दिलेल्या रिपोर्टनुसार माहिती मिळाली आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात हे षडयंत्र आहे – महापौर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका निवडणुका लढणार आहेत. पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळो वा न मिळो खाद्यांला खादा लावून शिवसेनेतील जेष्ठ पदाधिकारी त्यांच्यासोबत काम करणार आहेत. परंतु शिवसेनेत दुफळी निर्माण करणे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मत खराब करणे, असे षडयंत्र सुरू आहे, असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. महापौरांनी आज (७ जानेवारी) मुंबई वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना पालिका निवडणुकीत जबाबदारी सोपवण्यात येणाऱ्या चर्चेवर भाष्य केले आहे. 

महापौर म्हणाल्या, “आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व सुरू होय, याची धडकी भरली, यामुळे असे बेनामी ट्वीट किंवा सोशल मीडिया वापरून शिवसेनेचे ज्येष्ठ नागरिका किंवा शाखा प्रमुख त्यांना नाउमेद करणे आणि पक्षावरील प्रेम आणि त्यांची निष्ठा कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तसे होणार नाही. तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून. येईल त्या संकटाला आम्ही सामोरे जावू मग आदित्य ठाकरे जाईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेलारांच्या ‘त्या’ व्यक्तव्यामुळे पेडणेकरांनी केली गृहमंत्र्यांकडे तक्रार

News Desk

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

News Desk

गृह विभागाचा मोठा निर्णय; कोरोना कालावधीतील 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेणार

News Desk