HW News Marathi
मनोरंजन

#IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु !

मुंबई | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या राज्य या भीषण पूरस्थितीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम पूरग्रस्तांच्या मदतीकरिता केंद्राकडे मागितलेल्या मदतीची, त्याचप्रमाणे राबविण्यात येणाऱ्या मदतकार्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतरचा हा पहिला स्वातंत्र्य दिन असल्याने त्याला एक विशेष महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :

  • काश्मीरबाबत घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर आजचा स्वातंत्र्य दिन अनोखा ठरतो
  • सध्या राज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरकार आणि अन्य यंत्रणांनी मोठ्या प्रयत्नाने पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. आता त्यांचे मोडलेले संसार पुन्हा उभारण्याचे आव्हान.
  • आम्ही केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे.
  • पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु.
  • या समस्येदरम्यान महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
  • आता राज्य दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भाग आम्ही दुष्काळ मुक्त करु.
  • समुद्रात वाहून जाणारे कोकणातले पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे.
  • दुष्काळी भागातले सगळे प्रकल्प केंद्राच्या मदतीने गतिमानतेने पूर्ण करून तो भाग दुष्काळमुक्त करू.
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
  • देशाच्या आर्थिक विकासात ३ ट्रिलियन व्यवस्थेत आमचा सर्वात मोठा वाटा असेल.
  • वंचित समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास पोहोचला पाहिजे हे डॉ.आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करू.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात

News Desk

लग्नानंतर अनुष्काचा आज पहिलाच वाढदिवस

News Desk

या मकरसंक्रांतीला तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा अन् वाढवा नात्यांमधील गोडवा

News Desk