HW News Marathi
महाराष्ट्र

… याचा अर्थ भाजपला लोकांनी नाकारले आहे; नवाब मलिकांचा हल्लाबोल

मुंबई | आज राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे, तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत, असे असताना मतांचे विभाजन होऊन देखील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीला लोकं स्वीकारत आहेत

राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. मात्र, काही अनुभवी नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाला यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करून त्याची कारणे शोधली पाहिजे. तसेच व्यवस्थित लक्ष दिले तर राष्ट्रवादीला लोकं स्वीकारत आहेत, हे आजच्या निकालावरून स्पष्ट होते, असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा, नाहीतर कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे!

News Desk

ब्लू व्हेल गेमवर केंद्राला विचारून बंद करणार

News Desk