HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्यावरच्या ‘त्या’ जीवघेण्या हल्ल्याच्या कटात जयंत पाटील सामील! – गोपीचंद पडळकर

मुंबई । भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. आटपाडी पोलीस स्टेशनसमोर आपल्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा सुनियोजित कट असून हा कट जयंत पाटलांचाच असल्याचा मोठा आरोप पडळकरांनी केला आहे. पडळकरांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. जो ७ नोव्हेंबर २०२१ चा आटपाडी पोलीस स्टेशन बाहेर झालेल्या हल्ल्याच्या वेळचाच असल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे. “पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता”, असा दावाच पडळकरांनी आपल्या व्हिडीओत केला आहे.

गोपीचंद पडळकरांनी यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. “आटपाडी पोलीस स्थानकाबाहेर स्वतः पोलीसच या हल्ल्याचं चित्रीकरण करताना दिसले. त्यामुळे, हा संपूर्ण कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला गेला आहे”, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे या संपूर्ण कटात सामील असल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकरांनी केला आहे. दरम्यान, पडळकरांच्या या आरोपांमुळे हे प्रकरण गाजण्याची शक्य आहे.

अधिवेशनात ‘हा’ मुद्दा गाजणार?

राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे अखेरचे २ दिवस शिल्लक असताना सोमवारी (२७ डिसेंबर) सभागृहात हा मुद्दा छेडला गेला तर मोठा वाद होण्याची शक्यता आहे. सोबतच, मंत्री जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीकडून ह्या आरोपांना काय प्रत्युत्तर दिलं जातं? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश महाजनांमुळे अण्णा हजारेंचे उपोषण स्थगित

swarit

धरणे आंदोलन करणाऱ्या गर्भवती महिलेची आंदोलन स्थळी प्रसूती; प्रशासनाची डोळेझाक

Aprna

भाजप हा मोठा पक्ष आहे, कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही – देवेंद्र फडणवीस

News Desk