HW News Marathi
महाराष्ट्र

“अक्षयतृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका,” राज ठाकरेंचे ट्वीट करत कार्यक्रर्त्यांना आवाहन

मुंबई | औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केले. या सभेतून राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत राज्य सरकारला ४ मेचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राज ठाकरेंनी उद्या म्हणजे ईद आणि अक्षयतृतीया निमित्ताने होणाऱ्या महाआरतीच्या सर्व कार्यक्रमावर स्थगिती करावे, असे आदेश त्यांच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. ईद निमित्ताने होणाऱ्या महाआरती करू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून पत्रद्वारे सांगितले आहे. राज ठाकरेंनी काल (१ मे) औरंगाबादच्या सभेत राज्यातील मशिदींवरील भोंगे वाजले तर त्यासमोर तेवढ्याच मोठ्या आवाजाने हनुमान चालिसा लावा, असे म्हणाले.

राज ठाकरेंनी ट्वीट म्हणाले, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाचे साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. आणि त्याबाबत आपण पुढे नेमके काय करायचे; हे मी उद्या माझ्या ट्वीटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढेच!”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या  घोटाळेबाज मंत्र्यांना शिवसेनेने केले लक्ष 

News Desk

रामनाथ कोविंद यांचा उद्धव ठाकरेंना

News Desk

गुजरात मधील भक्ताने अर्पण केला शनीचरणी १९ लाखांचा कलश

News Desk