HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरेंची सभा औरंगाबादमधील महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणाल असून गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. औरंगाबाद सभेसाठी राज ठाकरे हे काल (१ मे) पुण्याहून निघण्याआधी निघाले होते. याआधी गुडीपाढवा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर भोंगा आणि हनुमान चालिसाने राज्याचे राजकारण तापले आहे. यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटींचे पालन करणार असून पोलिसांना सहकार्य करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी (२८ एप्रिल) माध्यमाशी बोलताना दिली आहे  राज ठाकरेंची सभा ही सायंकाळी ५ वाजेपासून ते ९.३० दरम्यान आयोजित करण्यात यावी. राज ठाकरे हे ७.३० वाजता बोलणार असल्याची माहिती मिळाली आहे.  यासभेत १५ हजारपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करण्यात येऊ नये. आणि सभेत सहभागी होणाऱ्या हुल्लडबाजी, घोषणाबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. 

सभेसाठी ‘या’ अटी असणार आहेत

  • ही सभा सायंकाळी ४.३० वाजेपासून ते ९.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात याव
  • सभेत वंश, जात, धर्म, वर्ण, भाषा आणि प्रदेशावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये
  • सभेदरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये.
  • सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करावा
  • सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार म्हणजे चेंगराचेंगरी किंवा गोंधळासारखा प्रकार घडला त आयोजित जबाबदार असणार
  • सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेट्स उभारावे.
  • सभेसाठी १५ हजारहून अधिक लोकांना निमंत्रित करण्यात यावे.
  • सभेसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे.
  • सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी स्फोटक बाळगू नये
  • अट २, ३ आणि ४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आयोजकांनी करवण्याची जबाबदारी आहे
  • सभेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचे नावे, मोबाईल नंबर आणि सभेत येणाऱ्या लोकांची संख्या एक दिवस आधी पोलिसांना कळवावी.
  • सभेदरम्यान रुग्णवाहिका, दवाखाना, पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा यांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • सभेदरम्यान मिठाई आणि अन्नधान्याचे वाटप होते असेल तर कोणाला विषबाधा होणार नाही यांची काळजी आयोजकांनी घावी
  • सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाल्यास पर्याय व्यवस्था आयोजकांनी करावी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम! 

News Desk

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna

शासकीय कर्मचऱ्यांचे निवृतीचे वय ६० होणार

News Desk