HW News Marathi
महाराष्ट्र

खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खळबळ जनक आरोप केले होते. यानंतर रामदास कदम हे आज (२४ डिसेंबर) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेसाठी दाखल झाले होते. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या निलंबित करण्याच्या मुद्यावरून त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करत शिवसेनेला घराच आहेर दिला आहे. 

रामदास कदम म्हणाले, “खेडचे नगरध्यक्ष वैभव खेडेकर यांना अपात्र करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला असताना त्यांना अपात्र का केले जात नाही?, आणि खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? असे सवाल विधानपरिषेदत उपस्थित करत महाविकासआघाडी सरकारला घेरले आहे. त्याचबरोबर कदमांनी खेडेकरांवर भ्रष्टाचाराच्या मुद्दे मांडताना राज्य सरकारने लक्ष दिले नाही. खेडेकरांना अपात्र करण्यासाठी खेडमधील ५० टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. सरकारने २० पैकी ११ मुद्दे हे कसे काय अपात्र होऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. नियमानुसार नगरविकास खात्याने १५ दिवसात खेडेकरांना अपात्र करायला पाहिजे होते. गेल्या दोन महिन्यापासून खेडेकरांना अपात्र करण्याचा प्रस्ताव सरकारने रोखून ठेवला असून त्यांना अपात्र का केले जात नाही?, असा सवाल सरकारवर केले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”, मनसुख हिरेनच्या मृत्यूवरुन चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल  

News Desk

अनिल देशमुख म्हणतात, “दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे!”

News Desk