HW News Marathi
महाराष्ट्र

काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई | “जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत. त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे,” असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावाल आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्ताने उद्धव ठाकरेंनी काल (२३ जानेवारी) शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. “जसे काळजीवाहू सरकार असते तसे काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजी वाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटले तरी आपले दुख आहे,” असे म्हणत उद्धव ठकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.  

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण त्यांना पोसले. होय, पोसलेच, आणि मी मागे एकदा बोलो होतो. गोरेगावच्या सभेत की २५ वर्ष आपली युतीमध्ये सडली. तीच भूमिका आणि तेच मत माझे आजही कायम आहे. आणि मी त्या मतावर ठाम आहे. यांचे कारण असे पूर्वी शिवसेना प्रमुख म्हणायचे की, राजकारण म्हणजे गजकर्ण आहे, जेवढे खाजवावे तेवढी ते अधिक खाज येते. तसे हे सगळे गर्जकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाही तर पुन्हा एकदा मथळा यायचा की, मी त्यांना गजकर्णी म्हटले. तसे नाही, ज्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले त्यांना मी म्हटले ते राजकराण म्हणून ते काही खाजवित आहेत. आपण यांच्यापासून का दुर्वलो की त्यावेळेला आपल्याला शिवसेना प्रमुखांनी एक दिशा दाखविली. हिंदुत्वा हिंदुत्व कशासाठी, हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता आपल्याला सत्ता पाहिजे होती. हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व आणि हा एक प्रश्न आहे. आजच यांचे जे पोकळ हिंदुत्व आहे. ते सत्तेसाठी आगीकारलेले ढोग आहे. होय, तसेच आहे. जसे वाघाचे कातडे पांघरलेल्या काय गाढव म्हणा, शेळी असते तसे हे आता आपल्या लक्ष्यात आले. २५ वर्ष ह्यांना पोसल्यानंतर लक्ष्यात आले.”

आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली, उजेडात शपथ घेतली

“आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली, उजेडात शपथ घेतली. तुम्ही दिलेले वचन मोडल्यामुळे आम्ही नवीन घरोबा केला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर २०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचा मुद्दा आधोरेकित करत भाजपवर निशाणा साधला. “सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केले. भाजप फोडाफोडी करून सांगायचे की बघा, आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही. काल परवा ज्या निवडणुका झाल्या, बँका, नगरपंचायती, विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, महाराष्ट्र सोडूनही आपण आता निवडणुका लढवायचा. खरं हिंदुत्व घेऊन आपण पुढे जाऊ. हरलो तरी खचायचं नाही. आणि जिंकलो तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. आता झालेल्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी थोपटली पाठ!

News Desk