HW News Marathi
महाराष्ट्र

संदीप क्षीरसागरांनी पदासाठी रक्ताचं नातं तोडलं; महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय

बीड | पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे, अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केलं ? असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा…असा थेट आव्हानरुपी घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे.

तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे.माझे वय 60 वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गॅंग झाली आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

Aprna

“कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?”, सतेज पाटलांचा सवाल

News Desk

महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार यांनी NDA सोबत यावे, आठवलेंचा पवारांना सल्ला

News Desk