HW News Marathi
Covid-19

राज साहेबांच्या प्रश्नाचे उत्तर तेव्हाही सरकारकडे नव्हते आणि आत्ताही नाही आहे – राजू पाटील

मुंबई | राज्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन ५ मध्ये काही अंशी नियमांना शिथिलता दिली आहे. या अनलॉकमध्ये अनेक नियम हे शिथिल करण्यात आले. मात्र, अनेक दिवसांनी सर्व बाबी सुरू केल्यानंतर लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला तुमचा एक्झिट प्लॅन काय आहे याबद्दल विचारणा केली होती मात्र त्यावर सरकारकडून काही उत्तर आले नाही.

यावरूनच आता मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी “तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही, असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

News Desk

“पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो” असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण

News Desk

‘मातोश्री’वर आज धडकणार मराठा समाजाचा मशाल मोर्चा, मेटेंच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ ९ मागण्या 

News Desk