HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस बदलीबाबत सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. कारण राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मोठा आरोप केला आहे. देशमुख यांनी गृहमंत्री पदावर असताना पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवल्याची माहिती कुंटे यांनी ईडीला दिली आहे.

देशमुख हे गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुंटे यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख हे विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवत असत. त्यांचे खासगी सचिव संजीव पालंडे यांच्याद्वारे ते ही यादी पाठवायचे. तसेच आपण त्यांच्या अधीन काम करत होतो आणि त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला नकार देऊ शकत नव्हतो, असा जबाब कुंटे यांनी नोंदवला आहे.

दरम्यान, १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात आता कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच कुंटेंनी केलेल्या या आरोपांबाबत देशमुखांची चौकशी करणार आहे. त्याचबरोबर या ईडीने देशमुखांविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीत कुंटे यांच्याकडून मिळालेली माहितीही समाविष्ट करण्यात आल्याचे समजले आहे. या प्रकरणी आता ईडीची काय भूमिका असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग दानवे काय ‘शुद्ध घी’वाले आहेत काय ? ED कारवाईवरून बच्चू कडूंचा सवाल

News Desk

मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेसची नाराजी, राष्ट्रवादी-सेनेला थोरातांनी सुनावलं

News Desk

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाने काढला ‘हा’ तोडगा

News Desk