HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचारी कामावर रुजू झाले तर कारवाई होणार नाही! – अनिल परब

मुंबई | ज्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कावारई झालेली नाही. आणि त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. ते एसटी कर्मचारी कामावर रुजू रुजू झाल्यावर पुर्नविचार करू, असे आश्वासन परबां पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न हे चर्चेतून सोडण्याचे आश्वास परबांनी दिले आहे. आज (१० जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पवार, परब आणि कृती समितीच्या सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

गेल्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने वेतन वाढ केली होती. तर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात पगार वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांची पवार वाढ ही दोन करारात झाली असून यासंदर्भात आज एसटीची कृती समितीची चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे आवाहन परबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एसटीचे राज्यात विलीनीकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालायने तीन सदस्य समिती गठित केली असून याबाबत समिती त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर करेल.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमचे दायित्व 

परब म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा कामावर हजर होण्याची मुदत दिली होती. आणि कामावर रुजू झाल्यावर कारवाईवर फेरविचार करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यं जे एसटी कर्मचारी कामावर आलेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यापुढेही कामागारांवर कारवाई होणार नाही. आणि ज्या कर्मचाऱ्यांवर कावाई झाली त्यांच्याबद्दल अंतिम निर्णय लवकरच घेऊ. तसचे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमचे दायित्व आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल. तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे. जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही

संप मागे घेण्याचे समितीकडून कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचारी ही गेल्या दोन महिन्यापासून संपावर आहे. आज एसटी कर्मचाऱ्याच्या २२ संघटनाची असलेल्या कृती समितीसोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार आणि अनिल परब यांच्या उपस्थिती समितीच्या सदस्यांसोबत चर्चा झाली. यानंतर या समितीच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मातोश्री बाहेर पडावं लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk

PandharpurElection : पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु, राष्ट्रवादी की भाजप कोण बाजी मारणार?

News Desk

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवसैनिकांचे आमरण उपोषण

Gauri Tilekar