HW News Marathi
महाराष्ट्र

अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! – शरद पवार

मुंबई | अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे ही काँग्रेसची मोठी चूक झाली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. देशात आज (१० मार्च) पाच राज्यात निवडणुकीचे निकाल लागला आहे. यात पाचपैकी चार राज्यात भाजपची सरकार आली आहे. तर पंजाबमध्ये आपची सरकार आली आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी भाजप आणि काँग्रेसला परभूत करत आपच्या हातात राज्याची सत्ता दिली. केजरीवालांनी दिल्लीत केलेल्या कामगिरीमुळे पंजाबमध्ये आपला मोठा विजय मिळाला आहे, असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारबद्दल राग होता. तो राग देशातील पाचपैकी चार राज्यात भाजपचे सरकार होते. फक्त पंजाबमध्ये आपची सरकार आल्याने वेगळे चित्र बद्दले. पंजबामध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असेला राज्यात पराभव झाल्यामुळे त्यांच्या खूप मोठा झटका देणार आहे. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे ही काँग्रेसची मोठी चूक झाली. शेतकरी आंदोलनात पंजाबचा मोठा सहभाग होता. पंजाब निवडणुकीत किसान आंदोलनात मोठा परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे पंजाब शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असे ते म्हणाले. 

तृणमूल काँग्रेसने सर्व जागा लढवायच्या आणि अन्य पक्षाचे लोक घेऊन जागा लढवायचे हे त्यांनी टाळले तर बरे होईल. उदाहणार्थ माझ्या पक्षाचा एकच आमदार होता. गोव्यात तृणमूलने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. आणि इतर पक्षाच्या लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्यापक्षातील चर्चिल हे त्यांच्या पक्षात गेले. या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी कोणत्याही राज्यात आपले स्थान निर्माण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांचा तुरुंगवास हे एक राजकीय षडयंत्र

News Desk

“खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा”, विजय वडेट्टीवारांचा पडळकरांवर पलटवार!

News Desk

निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

News Desk