HW News Marathi
महाराष्ट्र

महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही! – सुप्रिया सुळे

मुंबई | “चाणक्य शिवाय चंद्रगुप्तला कोण विचारेल, तर समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल,” असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात केले आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांनी काल (२७ फेब्रुवारी) औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्यव्य केले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्यपालांच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत म्हटले, “मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही,” असे त्यांनी ट्वीट करत राज्यपालांच्या वक्तव्याचे खंडण केले आहे. 

राज्यापाल नेमके काय म्हटले

राज्यपाल म्हणाले, “चाणक्य शिवाय चंद्रगुप्तला कोण विचारेल, तर समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल?, मी चंद्रगुप्त किंवा शिवाजी यांना लहान दाखवत नाही. या प्रत्यकामागे त्यांच्या आईचे मोठे योगदान आहे. तसेच आपल्या समजात गुरूचे मोठे स्थान आहे. शिवाजी महाराजांनी म्हटले, समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने मला राज्य मिळाले. आपल्या देशाची परंपरा आहे. तर गुरुदक्षिणा द्यावी लागते. मी जिंकलो, राज्याची स्थापना झाली आणि मी रायगडावर आलो. आता गुरुदक्षइणा म्हणून तुम्ही राज्याची चावी तुम्हाला देतो, असे शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले. पण, समर्थांनी महाराजांकडून चावी घेतली नाही, समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना ते राज्याचे विश्वस्त असल्याचे सांगितले. तसेच हा भाव सदगुरूकडे होता,” असे ते म्हणाले. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

News Desk

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

News Desk

‘उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील’, नवाब मलिकांची टीका!

News Desk