HW News Marathi
मनोरंजन

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या हत्येबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत त्याचप्रमाणे त्यांना भारताचे राष्ट्रपिता देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. महात्मा गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

दिल्लीतील बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी पुरोगामी हिंदू नेता नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. नथुराम गोडसे हा जहालमतवादी हिंदू महासभेशी संबंधित होते. नथुराम गोडसेच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. यानंतर गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली.

  • दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे ३० जानेवारी १९४८ रोजी ७९ व्या वर्षी महात्मा गांधींची हत्या झाली.
  • महात्मा गांधींना ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी ५.१२ वाजता गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.
  • महात्मा गांधीजी यावेळी प्रार्थनेच्या बैठकीच्या मार्गावर जात असताना हिंदु महासभाचा एक प्रमुख सदस्य नथुराम गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
  • नथुराम गोडसेने बरेटा एम १९३४ पिस्तुलाने महात्मा गांधींच्या छातीत तीन वेळा गोळ्या झाडल्या.
  • नथुराम गोडसे यांचे साथीदार नारायण आपटे यांना महात्मा गांधींच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा दिली. तर नथुराम गोडसेचा भाऊ गोपाल यांच्यासह ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
  • महात्मा गांधीजींचे शेवटचे शब्द “हे राम” असे होते.
  • महात्मा गांधीजींना ठार मारण्याचे पाच अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संक्रांतीच्या मुहूर्तावर ‘ठाकरे’ पतंगांची क्रेझ

News Desk

#IndependenceDay : स्टार्ट-अप इंडियाचा नारा, भारताची एकता ही आपले संपत्ती !

News Desk

ख्रिसमस ट्री नक्की का सजवला जातो !

News Desk