HW News Marathi
मनोरंजन

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काय म्हणाले पंडित नेहरू ?

दिल्लीतील बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी पुरोगामी हिंदू नेता नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. नथुराम गोडसे हा जहालमतवादी हिंदू महासभेशी संबंधित होते. नथुराम गोडसेच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. यानंतर गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ‘हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण म्हणतात परंतु त्याची सत्यता वादग्रस्त आहे.

महात्मा गांधींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. अलाहाबाद येथील संगमावर १२ फेब्रुवारी १९४८ रोजी जवळपास या सर्व अस्थींचे विसर्जन करण्यात आले. पण नंतर असे लक्षात आले कि काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर तुषार गांधी यांनी १९९७ रोजी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. एक रक्षापात्र दुबईतील व्यापार्‍याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. आणखी एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे. येथे १९४२ ते १९४४ च्या दरम्यान गांधीजी बंदिवासात होते. तर दुसरे एक रक्षापात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे.

महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर पंडित नेहरूंचे भाषण

महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले. “माझ्या मित्र आणि सहकार्‍यांनो आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे. आता सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मला कळत नाही मी तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ असे म्हणत असू ते आता आपल्यात राहिले नाहीत. कदाचित असे म्हणणे देखील चूकच ठरेल. परंतु आपण आता त्यांना तसे पाहू शकणार नाही जसे आपण त्यांना इतकी वर्षे पाहत आलो आहोत. आता आपण एखाद्या गोष्टीत त्यांचा सल्ला घ्यायला जाऊ शकणार नाही. त्यांच्या सान्निध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर देशातील कोट्यावधी लोकांसाठी एक मोठा धक्का आहे”, असे पंडित नेहरू म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स

News Desk

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk