HW News Marathi
क्राइम

“माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली”- किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाणे | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.किरीट सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आयुक्ताशीं भेटण्यापूर्वी मीडियाशी बोलताना सोमय्या यांनी हा गंभीर आरोप केला.

मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत

मी माझे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत. पण मी सुरक्षा मागितली नाही. मागणारही नाही. माझाबाबत जी धमकी आली ते फक्त नाटक आहेय नुसती एनसी पोलिसांनी घेतली, असंही ते म्हणाले.

ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 21 पक्ष आणि 21 नेते समोर येत आहेत. मग ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो या सोनिया गांधी. पण हे 21 लोक एक होऊन मोदी होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलडाणा अर्बनच्या कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष रुपयांचा अपहार

News Desk

महिला पत्रकाराचा विनयभंग

News Desk

प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसची घराबाहेर भोसकून हत्या 

News Desk