HW News Marathi
देश / विदेश

निर्भयाचे गुन्हेगार फासावर लटकल्याने कायद्याचा सन्मान राखला गेला !

मुंबई | संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज (२० मार्च) पहाटे ठीक ५.३० वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात आले. तब्बल गेला ७ वर्षांहूनही अधिक काळ सुरु असलेल्या या न्यायासाठीच्या संघर्षाला आज अखेर यश आले आहे. याच पार्श्वभूमीवर, सर्वच स्तरांतून एक प्रकारचे समाधान व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर लटकले. कायद्याचा सन्मान राखला गेला”, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “कायद्याचे राज्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही हा संदेश देणारी ही घटना आहे. या आरोपींची फाशी म्हणजे असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे”, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंसह महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “निर्भयाला अखेर न्याय मिळाला याचे समाधान वाटते. गेली ७ वर्षे निर्भयाच्या आईने जो संघर्ष केला त्यासाठी त्यांना मनापासून सॅल्यूट. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आज आरोपींना ही शिक्षा झाली. न्यायव्यस्थेला देखील मनापासून धन्यवाद देते. समाजाने एकत्र येऊन अशा विकृतीचा नायनाट करणे, यासाठी समाजाचे प्रबोधन होणे फार गरजेचे आहे. कारण, फार उशिरा मिळालेला हा न्याय हा देखील कधी कधी अन्याय वाटू शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे कि, त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करावा”, अशी मागणी यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM मोदी करणार 775 कोटींच्या ‘डिफेन्स कॉम्प्लेक्स’चे उद्घाटन

News Desk

एका सच्च्या पत्रकाराचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

News Desk