HW News Marathi
मनोरंजन

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित

नवी दिल्ली | स्वातंत्रदिना निमित्ताने केंद्र सरकारकडून आज (१४ ऑगस्ट) देशाचा सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराची घोषणा केली आहे. सरकारने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानाने पिटाळून लावणारे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

अनिनंदन यांच्यासोबत बेळगावचे जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर क्रिर्तीचक्रने सन्मानित करण्यात येणार आहे. जाधव कुलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर स्क्वडून लिडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

News Desk

‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर मुंबई पोलिसांची करडी नजर

News Desk

सरकारवर टीका केल्यामुळे अमोल पालेकरांचे भाषण रोखले

News Desk