HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेस रोखू शकतो – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीवरून राजकारण तापताना दिसत आहे. अश्यातच आता काँग्रेसने भाजपला चारही बाजूने घेरायाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला आहे. तर मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेसच रोखू शकतं,असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवायचं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे. पाच राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत, उत्तर प्रदेशात सध्या योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

देशाचे पंतप्रधान फक्त भाषणबाजी करतात, त्यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यांचं लक्ष देशाकडे नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार असा नाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर भाजप किती लवकर सत्तेत येते, याचंच स्वप्न पाहत आहेत. त्यांनी स्वप्न बघत रहावी, अशी कोपरखळीही त्यांनी मारली आहे.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यापासून त्यांची तब्येत खराब असल्यामुळे बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री बाहेर न आल्यामुळे भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. ह्या मुद्द्यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. चव्हाण म्हणाले,  “मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरु आहे, फक्त आताच त्यांचं ऑपरेशन झालंय, त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या फिरण्यावर काही बंधनं आहेत”,

दरम्यान, गेल्या अधिवेशनावेळीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी, असा सल्ला दिलेला. तर चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरेंकडे द्यावा, असा टोला महाविकास आघाडीला लावला होता. काही दिवसांपू्र्वीच मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत, त्यावरूनही बराच पॉलिटिकल राडा झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल

News Desk

पालघर मॉब लिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही, धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका !

News Desk

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

News Desk