HW News Marathi
क्राइम

#PulwamaAttack : आता आतंकवादविरोधी लढाई आणखी तीव्र होणार !

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह हे नुकतेच श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी आता याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आता ही आतंकवादाविरोधातील लढाई आणखी तीव्र होणार आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
  • आतंकवादाविरोधातील लढाई आता आणखी तीव्र होणार.
  • आतंकवाद्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल
  • लोकांचे रक्त उसळत आहे.
  • लोकांचा राग, त्यांच्या भावना योग्य आहेत
  • देश एकत्रितपणे याचा सामना करीत आहे
  • राजकारण बाजूला ठेऊन लोकांनी एकत्र यावे.
  • हल्लेखोरांना त्याची मोठी शिक्षा मिळणार, त्यांची गय केली जाणार नाही
  • पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर साधला निशाणा
  • दहशतवादाविरोधात जगातील सर्व देश एकत्र होतील
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तक्रार दिल्यानंतर परत शहरात फिरण्याची काय आवश्यकता? याचा अर्थ तुम्ही पब्लिसिटी स्टंट करत आहात- सतेज पाटील

News Desk

दिव्यांश सिंग प्रकरणात गुन्हा दाखल

News Desk

गोलंदाज बाद होतात तेव्हा, एकाच्या घरी चोरी, एकाच्या घरावर हल्ला

News Desk