HW News Marathi
अर्थसंकल्प

४५ वर्षात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सितारमन दुसऱ्या महिला

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहीला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला. निर्मला सितारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर करुन एक इतिहास रचला आहे. याआधी तब्बल ४९ वर्षांपुर्वी माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. इंदिरा गांधींनंतर निर्मला सितारमण या पहिल्या महीला केंद्रीय मंत्री आहे ज्यांनी अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय सांभाळले आहे. आणि आज त्यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

२८ फेब्रुवारी १९७० मध्ये इंदिरा गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या पंधरा पानी अर्थसंकल्पात विविध घोषणा करुन संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी भविष्य निर्वाह निधीबाबत (ईपीएफ) मोठी घोषणा केली होती. ईपीएफमध्ये कर्मचाऱ्याचे ८ टक्के आणि संस्थेच्या भागीदारी शिवाय सरकार आपला वाटा देईल. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन म्हणून ही रक्कम संबंधित कुटुंबियाला दिली जाईल, अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यांनी शहर विकास महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती.

त्यांनी सरकारी योजनांच्या खर्चात १५ टक्के वाढ देखील केली होती. परिवहनासाठी त्यांनी ८४ कोटी, ऊर्जा ३१ कोटी, कुटुंब नियोजन आणि सामाजिक कार्यांसाठी त्यांनी अर्थसंकल्पात २८ कोटींची तरतूद केली होती. तर आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरीकांसांठी मोठ्या घोषणा होणार असल्याची आशा निर्मला सितारमण यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

योगी सरकारचा ४ लाख ७० हजार ६८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

News Desk

PFB : आता आयकरात ५ लाख रुपयापर्यंतची सूट वाढवणार का ?

News Desk