HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

मुंबई | वरळीच्या चेतना क्रिडा मंडळच्या देवीला यंदा २९ वर्षे पुर्ण होत आहेत. चेतना क्रिडा मंडळच्या देवीला चेतनाची माऊली म्हणून संबोधले जाते. १९८९ ला सुरुवातीला या मंडळात नवरात्रोत्सवात देवीच्या प्रतिमेचे पूजन होत असे. कालांतराने देवी नवसाला पावत असल्याची रहिवाश्यांमध्ये धारणा झाली. त्यामुळे प्रतिमा पूजन बंद करुन रहिवाश्यांनी देवीच्या मुर्तीची स्थापना करायला सुरुवात केली.

१९८९ पासून २०१० पर्यंत या देवीची प्राणप्रतिष्ठापणा गोपाळनगरच्या झोपडपट्टीतून जाणा-या एका रस्त्याच्या कडेला केली जात असे. २०१० ला ही झोपडपट्टी पुनर्वसनासाठी तोडण्यात आली. तरीही रहिवाश्यांनी नवरात्रोत्सवात कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. २०१४ ला या ठिकाणी महालक्ष्मी कॉम्प्लेक्स ची निमिर्ती झाली. गोपाळनगरच्या रहिवाश्यांनी २०१४ नंतर नवीन जागेवर देवीच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरुवात केली.

इतक्या वर्षात भक्तांची सावली अशी ख्याती असलेल्या या देवीची लोकप्रियता आजही तितकीच टिकून आहे. मंडळाने यंदा तरुणांना संधी दिल्याचे पहायला मिळते. नवीन संकल्पना मांडून जनजागृती करणाऱ्या या मंडळाचे अध्यक्ष केतन तानावडे यांनी यंदा सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच बच्चे कंपनीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

मंडळाचे कार्यकर्ते विशाल चिंदरकर, विकी कारमपुरी, श्रीकांत कुलकर्णी, मंडळाचे सेक्रेटरी मनोज केळकर, खजिनदार प्रमोद बणे, विजय पवार , स्वप्नील मडवी नवनवीन संकल्पना मांडत नवरात्रोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करताना पहायला मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीनिमित्त दांडिया आणि घागरा-चोलीची बाजारात विक्री

Gauri Tilekar

आजचा रंग हिरवा, ‘चंद्रघंटा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

महिला उद्योजिका मीनल मोहाडीकर

News Desk