HW News Marathi
राजकारण

मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका !

मुंबई | मनसे मुंबईत सीएए-एनआरसीच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२७ जानेवारी) रंगशारदा येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहिले होते. या बैठकीत या समर्थन मोर्च्यासह अन्य काही मुद्द्यावरून देखील राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे. २३ जानेवारीला झालेल्या मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची नवी भूमिका स्पष्ट केली. आता मनसेने हिंदुत्त्वाची कास धरणार असल्याचे स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर “मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका”, अशा स्पष्ट सूचना आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

“हिंदुहृदयसम्राट संबोधणे हा बाळासाहेबांचा मान आहे. मी बाळासाहेबांइतका मोठा नाही. मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका”, अशा सूचना राज यांनी दिल्या आहेत. याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या झेंड्याचा योग्य तो मान राखलाच गेला पाहिजे, अशाही सूचना राज यांनी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. “कुठल्याही प्रकारे शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्यांचे अनादर होता काम नये, याची दक्षता घ्या. ज्या प्रभागात राजमुद्रा असलेला झेंडा लावण्यात येईल त्या विभाग अध्यक्षाची ही जबाबदारी असेल”, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी आपली नवी राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. आता मनसे हिंदुत्त्वाची कास धरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २३ जानेवारीला झालेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यात राज ठाकरे यांनी सीएए-एनआरसीला आपला पाठिंबा दर्शविला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी आमचा केंद्राला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राज यांच्या या सतत बदलत्या राजकीय भूमिकांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट न पाहता दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या !

News Desk

दक्षिण मुंबईत काँग्रेसाचा विराट मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्षांचाही सहभाग

News Desk

‘मन की बात’ मधून मोदींनी साधला भारतीयांशी संवाद

News Desk