HW News Marathi
राजकारण

…तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही !

मुंबई | “आम्ही जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणार नाही”, असे विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपने आपल्या मित्र पक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र, मित्रपक्षांनी आम्ही आमच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर, रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात भाजपप्रणित एनडीए सरकारला घवघवीत यश मिळाले. या यशात भाजपला त्यांच्या मित्रपक्षांची खंबीर साथ लाभली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपकडून होत असताना मित्र पक्षांचा मात्र यास नकार असल्याचे दिसून येत आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मित्रपक्षांनी भाजपच्या नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. टिकवून ठेवण्यासाठी ते आपल्या मतांवर ठाम आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

News Desk