HW News Marathi
मुंबई

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये आरटीओच्या ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची’ भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परंतु उच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने न्यायालयाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. आपल्याला नोकरीत सामावून घ्यावे यासाठी या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला अभाविप शिष्टमंडळाने भेट देत त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे.

उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, गरज पडल्यास शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे अशा मागण्या यावेळी प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सरकारकडे केल्या आहेत. तसेच या सर्व प्रकरणात अभाविप आपल्यासोबत असेल मत यावेळी ओव्हाळ यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे याचा सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

प्रथमच या भरती प्रक्रियेत अधिक विद्यार्थी/युवकांना सामावून घेण्यासाठी शासनाने भरती प्रक्रियेत काही बदल केले. याच धर्तीवर ८३२ उमेदवारांची निवडही झाली. परंतु न्यायालयात प्रकरण गेल्यावर परिवहन विभागातर्फे त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. त्याचा परिणाम होतकरू, मेहनती ८३२ विद्यार्थ्यांवर झाला. यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओ संदर्भात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

News Desk

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk