HW News Marathi
क्राइम

अमरावती जिल्ह्यातील शाळेत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

अमरावती | भातकुली तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयातील भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शुक्रवारी (१८ जानेवारी) दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव वैभव गावंडे (१३) असे असून तो इयत्ता आठवीत शिकत होता.

वर्ग सुरू असताना अचानक ही भिंत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. सध्या स्थिती तणावपूर्ण आहे. जखमी विद्यार्थ्यांना देवरी व अनकवाडी आणि आष्टी येथील रुगणालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

News Desk

नांदेड जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

News Desk

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk