HW News Marathi
महाराष्ट्र

दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने सुनावले

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्या वारंवार माध्यमांसमोर जाण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांनी माध्यमांसमोर जाऊन बोलणे योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने आहे.

दाभोळकर हत्या प्रकरणात आता अटक करण्यात आलेले आरोपी नक्की तेच आहेत ना याची खात्री करून घ्या. नाहीतर खरे आरोपी बाहेर मोकाट राहतील, अशी शंका यावेळी न्यायालयाने उपस्थित केली.

पत्रकार परिषदेवर नाराजी

त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवरदेखील उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. “प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर जाऊन सर्व पुरावे उघड करणे हे आम्हाला बिलकुल पटले नाही”, असे न्यायालयाने सुनावले.

इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका

इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतःचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने यावेळी कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्याऱ्या एसआयटीला दिली.

सीबीआय आणि एसआयटीने डॉ. दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आपल्या तपासाचा प्रगती अहवाल आज (गुरुवारी) उच्च न्यायालयात सादर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी !, फडणवीसांचा खोचक सल्ला

News Desk

बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, मनसेचा सरकारला टोला

News Desk

शिवसेना नेते संजय राठोड आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

News Desk