HW News Marathi
राजकारण

वाकडी गावास केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार

मुंबई | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावात विहिरीत पोहल्यामुळे मातंग समाजाच्या तीन मुलांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणातील पीडित मातंग समाजाच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या शनिवार दि १६ जून रोजी जामनेर मधील घटना घडली त्या वाकडी गावास भेट देणार आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची सूद्धा भेट घेणार असल्याचे रामदास आठवलेंनी कळविले आहे.

वाकडी गावात मारहाण झालेली तिन्ही मुले ही मातंग समाजाची असून अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना जबरी मारहाणीबद्दल पोक्सो कायद्यानुसार गुन्हा आणि एट्रॉसिटी ऍक्ट नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे तसेच याप्रकरणी गुन्हा मागे घेण्यासाठी या मुलांच्या पालकांवर दबाव टाकला जात असल्याची तक्रार अली असून या बाबत गुन्हा मागे घेण्याचा प्रश्न नसून आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षकांची ही भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्तांमध्ये कधीही संघर्ष झाला नाही. मात्र या प्रकरणात भटक्या विमुक्त समाजाच्या विहीर मालकाने मातंग समाजाच्या मुलांना मारहाण केली आहे. भटक्या विमुक्त आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यात या गावात जातीय द्वंद्व होऊ शकत नाही मात्र तरीही संबंधित गावात दोन्ही समाजाला शांतता पाळण्याचे आवाहन करण्यासाठी त्या गावास शनिवरी आपण भेट देणार असल्याचे रामदास आठवलेंनी प्रसारमाध्यमांना कळविले आहे.

दलित अत्याचारांच्या घटनांचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. अनुसूचित जातीजमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नांवरून कोणी राजकारण करू नये. जातीय अत्याचार हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. जातीय अत्याचाराचा मुद्दा सामाजिक दृष्ट्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सोडविला पाहिजे. जातीभेद निर्मूलनासाठी सामाजिक प्रबोधन झाले पाहिजे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत !

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळी निमित्ताने शिंदे सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Aprna

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna